Posts

Image
  कर्जतमध्ये वाहतूक कोंडीबाबत बचाव समितीचे पोलिसांना निवेदन, कर्जत | पंकेश जाधव :-  कर्जत शहरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर, कर्जत शहर बचाव समिती वतीने कर्जत पोलिस ठाण्यात आज दिनांक ११ जून रोजी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शहरातील प्रमुख वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तातडीने आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील बाजारपेठ, श्रीराम पूल आणि चारफाटा परिसरातील नो-एंट्रीचे उल्लंघन, ट्राफिकचे अकार्यक्षम नियमन आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे होणाऱ्या तणावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यासाठी बचाव समितीने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत: यामध्ये बाजारपेठ आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ट्राफिक फाईन प्रणाली सक्षम करणे., नो-एंट्री झोनमध्ये टायर किलर बसवणे जेणेकरून अप्रामाणिक प्रवेश थांबवता येईल., श्रीराम पूल व चारफाटा येथे सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करणे जेणेकरून ट्राफिक पोलीसांवरचा भार कमी होईल., शहरासाठी कायमस्वरूपी ट्राफिक पोलिसांची नियुक्ती करणे ही गरज वेळोवेळी अधोरेखित केली जात आहे.,बचाव समितीने कर्जत नगरपरिषद व पोलिस...
Image
  जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते  61,125  कोटी रु जिल्हा पतपुरवठा पुस्तिकेचे अनावरण  पीक कर्जाची मार्चअखेर 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करा--जिल्हाधिकारी किशन जावळे   रायगड : प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील बँकांनी मार्च 25 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात  प्राथमिकता क्षेत्रासाठी 8 हजार 800 कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे उद्दिष्ट असताना बँकानी 9 हजार 342 कोटी (106%)कर्ज वाटप झाल्याची माहिती देवून जिल्हाधिकारी  किशन जावळे यांनी सर्व cबँकांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, सर्व बँकांचा आणि सरकारी विभागांचा योग्य समन्वय असल्याने  मोठे उदिष्ट ही साध्य करता येते. असाच समन्वय आणि परस्पर सहकार्य या आर्थिक वर्षात सुद्धा पुढे चालू ठेवावे असे आवाहन जिल्हाधिकारी  किशन जावळे यांनी केले. किसान क्रेडिट कार्डसाठी असणारे रू.625 कोटी उद्दिष्ट  प्रत्येक सरकारी,खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांनी 100 टक्के पूर्ण  करा.  तसेच  मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड देण्याला प्राधान्य द्या, असे सांगून बँकांनी व शासकीय ...
Image
 कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन,भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335  रायगड : प्रतिनिधी : कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास तालुकस्तरीय तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335 ला संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.  जिल्हयात खरीप हंगाम 2025-26 करीता बियाणे, खते व कीटकनाशके या कृषि निविष्ठांचा दर्जेदार तसेच सुरळीत व वेळेवर मुबलक पुरवठा होण्यासाठी कृषि विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. निविष्ठांबाबतच्या गुणवत्ता नियंत्रणाकरिता जिल्हा स्तरावर व प्रत्येक तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन केलेली आहेत. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे पथक प्रमुख तर  जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत आणि तालुकास्तरीय भरारी पथकाचे तालुका कृषि अधिकार...
Image
  जिल्हाधिकाऱ्यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रांला सरप्राईज भेट: कामकाजाची केली पाहणी, रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या केल्या सूचना रायगड : प्रतिनिधी :-  रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या केंद्रात येणाऱ्या रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या सूूचना त्यांनी यावेळी केल्या.  यावेळी जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी  रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच दररोज किती रुग्णांची तपासणी केली जाते, किती रुग्णांना संदर्भाकित केले जाते, त्याची कारणे योग्य आहेत किंवा नाहीत याची पाहणीही केली. या शिवाय काही रुग्णांशी संवादही साधला.  दरम्यान, ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून काम करण्याच्या सूचना दिल्या, विनाकारण रुग्णांना संदर्भाकित करू नये त्यांच्यावर आरोग्य केंद्र स्तरावर उपचार करावेत. तसेच रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना योग्य वागणुक द्यावी. एकही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूच...
Image
 
Image
 
Image
  रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी रायगड : प्रतिनिधी :- भारत सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केल्यानंतर, संभाव्य बदला घेण्याच्या दृष्टीने दहशतवादी संघटनांकडून ड्रोनचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यात १७ मे २०२५ ते ३ जून २०२५ या कालावधीत ड्रोन व तत्सम उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार, रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच आजूबाजूच्या परिसरात ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर्स, हँग ग्लायडर्स आणि हॉट एअर बलून यांच्या उड्डाणास सक्त मनाई करण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या शिफारशीनुसार आणि कायदा व सुव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर...